सिटी हब मिडिया वणी…
महाशिवरात्रीचा उत्साह सुरू असतानाच झरी तालुक्यातील शिबला गावात एक अत्यंत थरारक आणि दुर्दैवी घटना घडली आहे. संशयाच्या जाळ्यातून निर्माण झालेल्या वादाचे रूपांतर हत्येत झाले असून, एका ४६ वर्षीय व्यक्तीला आपला जीव गमवावा लागला आहे. पाटण पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ माजली आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शिबला येथील रहिवासी संतोष टेकाम (४६) आणि त्यांचे शेजारी शालीक आत्राम (३५) यांच्यात सोमवारी (१६ फेब्रुवारी) किरकोळ कारणावरून बाचाबाची झाली. संतोष टेकाम हा महाशिवरात्रीच्या पुजेची तयारी करत असतानाच अचानक शालिक आत्राम याने हल्ला संतोष वर अमानुष हल्ला केला व सुऱ्याने सपासप वार करत संतोषचा खून केला संतोषला बचावची संधी सुद्धा मिळाली नाही.हल्ला इतका निर्घृण होता की संतोषच्या हाताचा पंजा वेगळा झाला व शिर ही धडापासून ही वेगळा करण्याचा प्रयत्न केला.
जागीच मृत्यू: सुऱ्याचे वार वर्मी लागल्याने संतोष टेकाम यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.
पत्नीवरही हल्ला: पती-पत्नीमधील भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या संतोष यांच्या पत्नीवरही आरोपीने वार केले. त्या या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
पोलीस कारवाई आणि बंदोबस्त
घटनेची कुणकुण लागताच पाटण पोलिसांनी तातडीने शिबला गाठले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी झरी येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आला आहे. सणासुदीच्या दिवशी गावात तणाव निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे.
खूनानंतर आरोपी शालिक पळून गेला परंतु पोलिसांनी काही तासांतच त्याला मार्थार्जुन इथून अटक करत त्याच्या मुसक्या आवळल्या…
सुरक्षा उपाय: उपविभागीय पोलीस अधिकारी सुरेश दळवे यांच्या मार्गदर्शनाखाली गावात सध्या मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
गावात भीतीचे सावट
शांतताप्रिय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शिबला गावात या घटनेमुळे दहशतीचे वातावरण आहे. किरकोळ संशयाने एका हसतखेळत कुटुंबाचा आधार हिरावून घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

























