सिटी हब मिडिया वणी…
राजूर-चिखलगाव गटात नव्या चेहऱ्याची चर्चा; फैजल खान यांचे नाव आघाडीवर…

जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा स्थानिक राजकारणात नव्या चेहऱ्यांची चर्चा रंग घेऊ लागली आहे. त्यात राजूर-चिखलगाव गटातून तरुण नेतृत्व म्हणून फैजल बशीर खान यांचे नाव चर्चेत आले असून, स्थानिक पातळीवर त्यांना व्यापक पाठबळ लाभत असल्याचे चित्र दिसत आहे.
स्वर्गीय बशीर खान हे राजूर परिसरातील सर्वधर्मीय समाजात आदराचे स्थान असलेले नाव होते. त्यांच्या सामाजिक कार्याचा वारसा पुढे नेत फैजल खान यांनीही समाजकार्याच्या माध्यमातून स्वतःची ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या उपक्रमांमुळे तरुणांमध्ये नव्या आत्मविश्वासाचा संचार झाला आहे.
गेल्या काही वर्षांत फैजल खान यांनी समाजातील विविध घटकांना एकत्र आणत संवादाचे पूल बांधले. धर्म, जात-पात बाजूला ठेवून त्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या अडचणी सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. त्यामुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व फक्त सामाजिकच नव्हे तर राजकीय क्षेत्रातही वेगळे स्थान निर्माण करत आहे.
राजूर परिसरातील राजकीय समीकरणांत फैजल खान यांच्या उमेदवारीमुळे नवचैतन्य निर्माण झाले आहे. स्थानिक जनप्रतिनिधी आणि कार्यकर्ते त्यांच्याकडे आशेने पाहत असून, आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत ते एक बलाढ्य स्पर्धक ठरतील, असा अंदाज राजकीय वर्तुळात वर्तवला जात आहे.
तरुणाईचा आवाज म्हणून फैजल खान हे नाव पुढे येत असून, वडिलांच्या समाजसेवेचा वारसा घेत त्यांनी आपल्या कार्यशैलीने वेगळी ओळख निर्माण केली आहे. राजूर-चिखलगाव गटात त्यांच्या नावाची चर्चा आता जोर धरत असून, नव्या नेतृत्वाचा पर्याय म्हणून त्यांच्याकडे बघितले जात आहे.

























