TAX BOMB,वणी नगरपरिषदच्या करवाढीविरोधात माजी आमदार विश्वास नांदेकर यांच्या नेतृत्वात २९ सप्टेंबर रोजी जनआक्रोश मोर्चा करपावतीची नगरपरिषदेत होळी…
गेल्या काही वर्षांपासून वणी नगरपरिषद प्रशासनाच्या बेजबाबदार कारभारामुळे शहरातील सर्वसामान्य नागरिकांचे अक्षरशः हाल होत आहेत. भ्रष्टाचार,गैरव्यवहार आणि अकार्यक्षमता यामुळे शहराचा विकास ठप्प झाला असून, याच काळात नगरपरिषदेकडून घरकरात भरमसाठ वाढ लादण्यात आली आहे.मूलभूत सुविधा नागरिकांना मिळत नाहीत. तरीसुद्धा नगरपरिषद प्रशासन जनतेवर करांचा डोंगर लादत आहे. विकासकामांना निधी न देता फक्त करवसुलीवर भर दिला जात आहे…
या अन्यायाविरोधात आता माजी आमदार विश्वास नांदेकर (शिवसेना शिंदे गट) रस्त्यावर उतरणार आहेत. २९ सप्टेंबर रोजी नगरपरिषद कार्यालयावर जनआक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, शहरातील सर्वसामान्य जनता मोठ्या संख्येने या मोर्चात सहभागी होणार आहे.
वणी नगर परिषदेचे लक्ष फक्त बिल्डर्स व डेव्हलपर्स, कंत्राटदार यांना फायदा पोहचविण्याकडे असून शहरातील नागरिकांच्या समस्येकडे नाही, पाणी शुद्ध नाही, साफसफाई नाही, पाण्याची अनेक एटीम बंद पडली आहेत,शहरात अशुद्ध पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांत विविध आजार पसरत आहेत,या सर्व गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करून नगरपरिषद प्रशासन नागरिकांना भरमसाठ कर वाढवून आर्थिक भुर्दंड लावत आहे व शहराची हद्दवाढ करून भरमसाठ कर वाढवून सरकारी खर्चाने विविध योजना काही लेआऊट मध्ये कार्यान्वित करण्यात येणार आहे, नगरपरिषदेची तिजोरी खाली असताना निर्मनुष्य वस्तीत हद्दवाढ करून तिथे सरकारी खर्चाने सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे…
असा आरोप ही माजी आमदार विश्वास नांदेकर यांनी केला आहे…
तसेच जनतेला त्यांनी आवाहन केले आहे की जनतेने नविन कराचा भरणा करू नये…

























