भाजपची सत्ता आल्यास वणीचा विकास वेगाने — माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वणीवर विशेष प्रेम असून 2016 मधील सभेत दिलेली बहुतेक आश्वासने पूर्णत्वास गेली आहेत, असे मत माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी व्यक्त केले. सिटी हब मीडियाशी संवाद साधताना त्यांनी आगामी निवडणुकीत भाजपची एकहाती सत्ता आल्यास वणीतील प्रलंबित विकासकामांना नवी गती देण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला.
मागील चार वर्षांपासून प्रशासकाकडे कारभार असल्यामुळे अनेक कामे अडथळ्यात अडकली होती. काही प्रकल्पांचे काम मंदावले, तर काही पूर्ण होऊ शकले नाहीत. मात्र भाजप नगराध्यक्ष आणि नगरपरिषदेत पक्षाची बहुमत सत्ता आल्यास वणीचा विकास द्रुतगतीने सुरू राहील, असे त्यांनी सांगितले.
Screenshot
विद्याताई आत्राम यांच्यासह भाजपचा व्यापक जनसंपर्क
या निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार विद्याताई आत्राम यांच्या सोबत भाजपचे सर्व उमेदवार जनतेपर्यंत पोहोचत आहेत.
प्रत्येक प्रभागात डोअर-टू-डोअर संपर्क, स्थानिक सभा आणि नागरिकांशी थेट संवाद यांद्वारे पक्षाचा प्रचार जोरात सुरू आहे.भाजपने अलीकडेच नवीन टीम गठीत केली असून ही संपूर्ण टीम पूर्ण ताकदीनिशी प्रचारात उतरली आहे.वणी नगरपरिषदेत भाजपची सत्ता आली पाहिजे, यासाठी सर्व सदस्य संघटितपणे प्रयत्नशील असल्याचे चित्र शहरभर दिसत आहे.
जनतेकडून सकारात्मक प्रतिसाद
प्रभागनिहाय प्रचारसभांना आणि भेटीगाठींना चांगला प्रतिसाद मिळत असून भाजपची जनाधार वाढत असल्याचा दावा संजीव रेड्डी बोदकुरवार यांनी केला.
“माझ्या कार्यकाळातील काही अपूर्ण प्रकल्प आहेत. सत्ता मिळाल्यानंतर ते सर्व कामे पूर्ण करण्यात येतील. वणीकरांना आधुनिक, स्वच्छ आणि सुंदर वणी देणे हा आमचा निर्धार आहे,” असे त्यांनी सांगितले.फडणवीसांशी थेट संपर्क — निधीची कधीही कमतरता नाही ,त्यांनी हेही स्पष्ट केले की त्यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी थेट संपर्क आहे.
“वणीच्या विकासासाठी आवश्यक निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही. फडणवीस साहेब स्वतः वणीच्या प्रकल्पांकडे लक्ष देतील,” असा ठाम विश्वास बोदकुरवार यांनी व्यक्त केला.