गल्ली पासून दिल्ली पर्यंत भाजप मध्ये कार्यकारिणी गठित होत आहे,वणी मध्ये ही याच अनुषंगाने भाजप यवतमाळ जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चौहान यांच्या मार्गदर्शनाखाली नवनियुक्त अध्यक्ष ऍड.निलेश माया महादेव चौधरी यांच्या नेतृत्वात नवीन कार्यकारिणी घोषित करण्यात आली…
ज्यामध्ये ४३ पदाधिकारी व ५३ सदस्य यांचा समावेश करण्यात आला आहे.या व्यतिरिक्त १६ शक्ती प्रमुख,४९ बुथ प्रमुख ही नियुक्त करण्यात आले आहे.
मागील लोकसभा, विधानसभा निवडणुकीत पक्षांतर्गत गटबाजी मुळे पराभवाचा धक्का बसल्यानंतर भाजप ने आता आगामी स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये नव्या दमाने,नवा उत्साहाने व नवीन टीम सह उतरण्याचा निर्णय घेतला आहे…
आता पर्यंत पडद्यामागे राहून पक्षाचे काम करणाऱ्या लोकांना यावेळी पडद्यावर येण्याची संधी दिली आहे असे नवीन कार्यकारिणीत दिसत आहे…
सोबतच नवीन कार्यकारिणी मध्ये जातीगत समीकरण ही बसवण्याचा प्रयत्न दिसून येत आहे…(सोबत फोटो)



महाराष्ट्रात भाजपने नवीन अध्यक्ष म्हणून रविंद्र चव्हाण यांची नेमणूक केली असून केंद्रातही भाजपला नवीन राष्ट्रीय अध्यक्ष मिळणार आहे व भाजपला समोरील निवडणुकीत आव्हान मोठे असणार आहे त्याच अनुषंगाने नवीन टीमचे गठन करून भाजपने आपली कंबर कसली आहे,आता नवीन गडी नवा डाव भाजप साठी किती फायदेशीर ठरणार हे आता लवकरच कळणार.
या कार्यक्रमात माजी आमदार संजीव रेड्डी बोदकुरवार,माजी जिल्हाध्यक्ष व नगराध्यक्ष तारेंद्र बोर्डे, वरिष्ठ सदस्य प्रा.महादेव खाडे,रवि बेलुरकर,संजय पिंपळशेंडे, श्रीकांत पोटदुखे,लवलेश लाल,संध्याताई अवताडे व इतर भाजप कार्यकर्ते उपस्थित होते…

























