सुनिल तुगनायत ,सिटी हब मिडिया वणी…
उकणी-बेलसनी प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नावर बच्चू कडूंचा रुद्र अवतार; चालत्या कारमधूनच WCL अधिकाऱ्याला थेट झापले!

वणी परिसरातील मौजा उकणी व बेलसनी येथील कोळसा खाण प्रकल्पग्रस्तांच्या प्रलंबित मागण्यांवरून शिवसेना (शिंदे) गटाचे विदर्भ प्रमुख, आमदार बच्चू कडू कमालीचे आक्रमक झाले आहेत. वणी दौऱ्यावर असताना प्रकल्पग्रस्तांनी प्रत्यक्ष भेटून निवेदन दिल्यानंतर, बच्चू कडू यांनी एका क्षणाचाही विलंब न लावता थेट चालत्या कारमधूनच वेकोलीच्या (WCL) संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्याला फोन लावला. अधिकाऱ्याकडून उडवाउडवीची उत्तरे आणि नियमांचे कारण पुढे केले जात असल्याचे पाहून बच्चू कडूंचा पारा चढला आणि त्यांनी “तुम्हारी पॉलिसी गई भाड में… सीधी बात करो!” अशा अत्यंत कडक शब्दांत अधिकाऱ्याची चांगलीच कानउघाडणी केली.

नेमकी काय आहे प्रकल्पग्रस्तांची समस्या व मागण्या?
‘कोळसा खान प्रकल्प ग्रस्त शेतकरी संघर्ष समिती, उकणी/बेलसनी’ने सादर केलेल्या निवेदनानुसार:
* ६०० एकर जमीन संपादन रखडले: निलजई व उकणी ओपन कास्ट माईन्सच्या विस्तारीकरणानंतरही उकणी खंड-१ मधील उर्वरित सुमारे १५% (६०० एकर) जमीन वेकोलीने अद्याप संपादित केलेली नाही.
* मातीचे ढिगारे व पुराचा तडाखा: जमिनीच्या एका बाजूला खाणीतील मातीचे प्रचंड उंच ढिगारे साचले आहेत, तर दुसऱ्या बाजूला वर्धा नदीचे पात्र आहे. परिणामी, शेतात पाणी व खार साचून जमिनीची पोत पूर्णपणे खराब झाली असून पिकांचे ८०% नुकसान होत आहे. यामुळे १७५ शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे.
* १० वर्षांपासून पुनर्वसन प्रलंबित: उकणी गावाच्या पुनर्वसनाची प्रक्रिया गेल्या १० वर्षांपासून रखडलेली असून ती अंतिम टप्प्यात आहे.
* अधिकाऱ्यांची आश्वासने हवेत: शेतकऱ्यांनी आमरण उपोषण व जलसमाधी आंदोलन केल्यानंतर, १ जुलै रोजी वेकोली मुख्यालयातील बैठकीत १५ दिवसांत प्रत्यक्ष पाहणी करून प्रश्न मार्गी लावण्याचे लेखी आश्वासन दिले होते; मात्र मुदत उलटूनही काहीच कार्यवाही झाली नाही.
चालत्या कारमधून फोनवर काय घडला थेट संवाद?
प्रकल्पग्रस्तांचे निवेदन हातात धरून चालत्या गाडीतूनच बच्चू कडू यांनी वेकोलीच्या अधिकाऱ्याला फोन लावला. या संभाषणात बच्चू कडू अधिकाऱ्यावर चांगलेच भडकले…
बच्चू कडू: “आप नये आये हो तो पहले पूरी बात कर लो… १५ दिन पहले उपोषण हुआ था, आपने लिखकर दिया था कि हम इसमें देखेंगे। अभी तक इसपर क्या कार्रवाई हुई वो बताओ मुझे?” > (अधिकाऱ्याने पॉलिसी व नियमांचे कारण सांगण्याचा प्रयत्न केला असता) > बच्चू कडू (संतापून): “अरे तुम्हारी पॉलिसी गई भाड में! सीधी बात करो… पॉलिसी-पॉलिसी तुमने देखा भी नहीं, सुना भी नहीं। क्या मुसीबत है वहां, अंधकार है और पॉलिसी की बात कर रहे हो?” > बच्चू कडू पुढे म्हणाले: “लोग मरने जा रहे हैं, २० साल हो गए उनको, बाजू में खेती नहीं कर सकते, आत्महत्या हुई है वहां और आप बोलते हो ठीक हो रहा है? ज्यादा बात मत करो, आपने क्या कार्रवाई की, प्रस्ताव भेजा या नहीं, वो बताओ! नहीं तो २० हजार लोग लेकर सीधे तुम्हारे ऑफिस में घुसूंगा और घेराव करूंगा!”
२० हजार लोकांसह वेकोली कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा:
बच्चू कडू यांनी अधिकाऱ्याला स्पष्ट शब्दांत बजावले की, कोळसा खाणीमुळे उद्ध्वस्त झालेल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी संपूर्ण ताकदीने उभे राहू. जर प्रशासनाने उर्वरित ६०० एकर जमिनीचे तात्काळ संपादन करून प्रकल्पग्रस्तांना नोकरी, मोबदला आणि पुनर्वसनाचा मार्ग मोकळा केला नाही, तर २० हजार प्रकल्पग्रस्त व शेतकऱ्यांची भव्य पदयात्रा काढून वेकोलीच्या मुख्यालयाला घेराव घालू आणि वेकोलीच्या कारभाराला ‘सळो की पळो’ करून सोडू.
आमदार बच्चू कडू यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे आणि थेट तंबीमुळे वेकोली प्रशासनाचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.आता वेकोली काय भुमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे…

























